Abhang Remix

रविवार, ऑक्टोबर २१, २००७

 

अभंग आस्वाद - ८

अवघा तो शकुन

अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥ १ ॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥
संग हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका म्हणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥३॥

मुहुर्ताचे मोल तुकाराम महाराजांना कमी करायचे नाही पण हरीभक्तांना सर्वच काळ शुभ व सगळ्याच दिशाही शुभ आहेत असे सांगुन त्यांनी मोठ्या कौशल्याने समाजातील बाह्य अवडंबर कमी केले. श्रद्धेवर आघात न करता भक्तिचाच उपयोग करून धर्मात शिरलेली गतानुगतिकता त्यांनी यशस्वीपणे कमी करून दाखवली व हेच वारकरी संप्रदायाचे सामुदायिक यश आहे असे मला वाटते.

लेबल: ,


posted by shantanu  # ४:४९ PM

Archives

जुलै 2004   ऑक्टोबर 2004   डिसेंबर 2005   जानेवारी 2006   मे 2007   जून 2007   जुलै 2007   ऑक्टोबर 2007   डिसेंबर 2007   फेब्रुवारी 2008   मे 2008   ऑगस्ट 2008   जून 2009   डिसेंबर 2009   एप्रिल 2010   ऑक्टोबर 2010   नोव्हेंबर 2014   एप्रिल 2015  

This page is powered by Blogger. Isn't yours?